Posts

Showing posts from September, 2018

सखी...

Image
मनी मानसी मनोहारी सखी तू , हर्षोल्हासित करितो हा मैत्रीगंध! तुजपाशी होतो व्यक्त दिलखुलास, कोणजाणे कोणजन्मीचा हा ऋणानुबंध!

शब्दांपलीकडले...

Image
हो तू देखील व्यक्त मनमोकळेपणाने,  मिळो आधार शब्दांना तुज शब्दांचा! होऊ देत त्यांची वाक्ये अशी काही,  ज्यांचा अर्थ लाभो शब्दांपलीकडचा!

|| मृद्गंध ||

Image
तहानलेल्या भुमीस काल पाऊस भेटला... कोरड्या तिज तनुवरी थेंबाथेंबाने रूतला... त्याच्या स्पर्शाने ती कुन्द... होतसे धुंद...  त्याचा निघेना पाय, वेड लावी मृद्गंध...

।। मायाजाल ।।

Image
रोज आता हूँ इस फरेबी मायाजाल पे... किसी अपने की तलाश मैं... . . . ऐ मानस, कोई सच्चा इंसान भी हैं यहाँ?

पाउस... तुझ्या आठवणींचा...

Image
ऑफीस मधल्या थंडगार एसी मधे बसून, मी काचेपलीकडे मुक्त बरसणारा पाउस पाहतो, तेव्हा आपसूकच तू आठवतेस मला... पहिल्या पावसात चिंब भिजलेली........ काचेवरून ओघळणारे थेंब जणू काही तुझ्या गुलाबी गालावरूनच ओघळताहेत, असा उगाचच भास होतो. डोळ्यांनी स्पष्टपणे दिसत असता देखील हातात येत नाहीत ते, अन् ओघळून जातात आपल्या नात्यातल्या अदृश्य काचेपलीकडून.. निमूटपणे... माझ्या कोरड्या मनावर त्याचेही ओले ओरखडे उमटतात... तुला एकच सांगणे आहे, कधीतरी अचानक ये आणि मुक्तपणे बरसू न जा... माझ्या कोरड्या मनावर! ठाउक आहे मला, ह्यावेळी देखील तू माझ्या हाती लागणार नाहिसच.... हातातून निसटणार्या वाळूप्रमाणे... पण तुझे मुक्त बरसणे मनात साठून राहील. तेवढी ठेव पुरेल मला... तू पुन्हा भेटेपर्यंत...... तुझा चातक. N.B. मग मधली कॉफी संपली आहे आणि मीटिंग ची वेळ देखील झालीय..... भेटत जा अशीच कधीतरी....... निदान आठवणींमधून......

|| Appraisal Letter ||

Image
मागील आठवड्यात, त्याला appraisal letter मिळाले. त्याला जी अमुक टक्के पगारवाढ मिळाली त्याबद्दल त्याला ना आनंद होता ना दुःख. प्रथमदर्शनी मनात विचार आला की बरी आहे आपल्या पगाराच्या मानाने. ठीक आहे. Let's move on! घरी गेल्यावर त्याने जेंव्हा बायकोला सांगितलें, तेंव्हा ती म्हणाली एवढीच? वर्षभर तू जे राब राब राबलास, वेळी अवेळी अगदी सणावाराला देखील जे client calls घेतलेस, काम केलेस त्याचा इतकाच मोबदला. सुरुवातीला फार काही बोलला नाही तो, पण मनातकुठेतरी कळ उमटली.तो तिला समजावण्याच्या सुरत म्हणाला अगं पण ठीकठाक आहे ना मग झालं तर. तिला काही पटलं नाही ते . चल जेवून घेऊयात असे म्हणून त्याने पटकन विषय बदलला. म्हटले उगाच डोक्यात किडा नको. पुढच्या दोन-चार दिवसात ऑफिस मधल्या सहकाऱ्यांशी बोलता बोलता कळाले कि अमक्या तमक्याला चांगलं मिळालाय appraisal आणि तमकीला तर promotion पण मिळालाय. ह्या विषयावर चवीने चर्चा होत राहिली. डोक्यात कुठेतरी तुलना नावाचा राक्षस जन्माला आला आणि तो स्वतःची तुलना इतरांशी करू लागला. तेंव्हा वाटले कि आपले जर ठीक आहे तर मग इतरांचे काय? त्यांना तर चांगलीच मिळाली आहे ना? त

तो, मी आणि इगो…!

Image
खूप दिवस झाले मन अस्वस्थ होत होतं. दिवसातून एकदा तरी त्याचा विचार मनात यायचाच. त्याच्याशी जवळ जवळ वर्षभर बोललो नव्हतो. मग एके दिवशी लावला फोन आणि बोललो. तसा व्यवस्थित बोलला, अगदी formally कोणाशीही बोलावं तसं. का कुणास ठाऊक मी त्याच्या आवाजात मायेचा ओलावा शोधत होतो, पण तसं काही जाणवलं नाही. त्याला म्हणालो कैक दिवस आपलं बोलणं किंवा भेटणं झालाच नाही, तेंव्हा भेटू. तो म्हणाला सध्या परगावी चाललोय १५ दिवस. मग मी म्हणालो आलास की फोन कर, तो हो म्हणाला नि मी फोन ठेवल ा. फारशी आशा नव्हती पण कुठेतरी आतून वाटत होतं की करेल फोन. त्याला येऊन आता महिना झाला पण त्याचा फोन काही आला नाही. एक मन उद्विग्न झाले की का नसेल केला त्याने फोन? तर दुसरे मन म्हणाले तुलाच नेहमी माघार घ्यायची काय गरज आहे? या हि वेळी तू तेच केलंस आणि त्यानेही. तू तुझ्या स्वभावाला धरून राहिलास, नाते टिकविण्याकरिता झालेले issues, गैरसमज, मनावरचे घाव आणि स्वाभिमान सोडून तू पुन्हा झुकलासच. अन त्याने नेहमीप्रमाणे, सख्खा भाऊ असून सुद्धा तुझ्या हाकेला साधी ओ देखील दिली नाही. तेंव्हा तूच विचार कर तुला कसे वागायचे आहे ते… खरंच हल्ली

।। उस्फुर्त ।।

Image
काय लिहावं बरं? खूप दिवस झाले चिवित्रयानवर काही विचार मांडून. सतत वाटतं की तुम्ही हे page like केले आहे म्हणजे तुमच्याकरिता काहीतरी पोस्ट करणे हे तर माझे प्रथम कर्तव्यच आहे ना! परंतु मी काही script-writer नाही, आणि म्हणूनच मला ठरवून लिहिता येत नाही. मी बापडा, सरळ, साधा आणि मुख्य म्हणजे मनस्वी माणूस. बापरे जास्तच होतंय का जरा?  ;)  पण मनस्वीपणा तनामनात रुजलेला. आणि म्हणूनच मनाला काही भावलं, रुचलं आणि तुमच्यासमोर मांडावे तरच बोट चालतात माझी. हो बोट चालतात असंच म्हणालो मी. आता लेखणी झरते, शब्द कागदावर आपोआप उतरू लागतात वगैरे अलंकारीक लिहिताच येत नाही. सगळा संगणकावरील बटणांचा खेळ. वळणदार हस्ताक्षर लोप पावले अगदीच. इतक्यात कोणी कोणाला स्वतःच्या हाताने पूर्वीप्रमाणे पत्रं लिहिल्याचे ऐकिवात नाही. पूर्वी कसे अक्षरावरूनच ओळख पटायची, ती पत्रं अक्षरश: काळजाशी धरता यायची. आपुलकीचा सुगंध असायचा पत्रांना. लिखाणाच्या पद्धत, टापटीप, अक्षराचे वळण वगैरे घटकांवरून पत्र लिहिणाऱ्या व्यक्तीच्या भावनांचा पक्का अंदाज बांधता यायचा. आता मात्र नुसतीच बटणांची टकटक, किंबहुना touchpad असल्यामुळे ते ही नाही. अक्ष

।। नांदी ।।

अनियमित नि असुरक्षित अशा आयुष्यत सुसूत्रता नि सुरक्षितता आणण्याकरिता माणसाने समाज निर्माण केला. अर्थातच चाकोरी म्हटल की नियम आले, ठराविक वेळी ठराविक पद्धतीनेच वागण्याची सक्ती आली... ... नि हळुहळु माणसा अंगी असलेला नैसर्गिक निरागस मोकळेपणा लोप पावत गेला. नि स्वत:च्या भावना मनाला वाटेल तेव्हा व्यक्त करणे हा वेडेपणा किम्बहुना "विचित्रपणा"त गणला जाऊ लागला.      तेव्हा हुक्की येईल तेव्हा नि स्व-इच्छेनुसार स्वत:ला व्यक्त करण्याचा "चिवित्र"पणा करण्यासाठी खास या ब्लॉगची निर्मिती केली आहे. तर मग इथे मज़कुर प्रकाशित करणे हे देखील सर्वस्वी मन देवतेच्याच लहरीवर अवलंबून नाही का? :)  - आपला आणि आपल्यातला चिवित्र...!